आंब्यासह काजू उत्पादक चिंतेत
ठाणे : शेतकऱ्यांना सातत्याने नवनवीन संकटांना सामोर जावे लागते. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो. अशातच बदलत जाणाऱ्या वातावरणाचा देखील शेती पिकांना फटका बसत आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. यावर्षी कोकणात थंडी उशीराने सुरु झाली आहे. त्यामुळे कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान सध्याची थंडी किंवा वातावरण पाहता यंदा हापूसचा मोसम उशिरा असणार आहे.
यावर्षी कोकणात उशिरानं थंडी सुरु झाली. त्यामुळं कोकणातील आंबा आणि काजू बागायतदार चिंतेत आहेत. दरम्यान, सध्याची थंडी किंवा वातावरण पाहता यंदा हापूसचा मोसम उशिरा असणार आहे. कारण वातावरणात झालेल्या बदलामुळे आणि लांबलेल्या थंडीमुळे मोहोर प्रक्रिया पुन्हा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. आंब्याचा हंगाम लांबल्यास मिळणाऱ्या दराबाबत देखील शेतकरी चिंतेत आहेत.
बदलत्या वातावरणामुळे कोकणात काही ठिकाणी आंब्यावर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फळगळ सुरु आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे आंबा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक ठिकाणी झाडांना मोहर आलेला नाही तर काही ठिकाणी मोहरामध्ये फळधारणा झालेली आहे. यावरही बदलत्या हवामानाचा परिणाम झालेला दिसत आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांवर संकट निर्माण झाले आहे.
सध्या रत्नागिरी जिल्ह्यात हापूस आंब्यावर तु़डतुडा आणि थ्रीप्स अळीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. याचा आंब्यावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळ हापूस आंब्याच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
बाग चांगली ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना औषधांसाठी मोठा खर्च करावा लागणार असल्याची माहिती देखील शेतकऱ्यांनी यावेळी दिली आहे. या फवारण्याचा खर्चही मोठा असणार आहे. त्याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.