मुंबई: उष्णतेने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एसी लोकलच्या तिकीट दरात 50 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ही घोषणा केलीय. 5 किमीसाठी एसी लोकलचे प्रवासी भाडे आता 65 रुपयांऐवजी 30 रुपये असेल.
मुंबईतील एसी लोकलचे तिकीट दर हे जास्त असल्याने त्याला मिळणारा प्रतिसाद कमी होता. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने एसी लोकलच्या तिकीट दरात घट करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत होती. आता या मागणीला रेल्वे प्रशासनाने सकारात्मत प्रतिसाद दिला असून तिकीट दरात 50 टक्क्यांची घट केली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आता अधिक गारेगार होणार आहे.