ठाणे पोलिसांची डीजिटल वारी
ठाणे : ठाणे शहर पोलिस आणि सामान्य नागरिक यांच्यातील दुवा बनलेल्या सोशल मीडियाच्या क्यू आर कोड या डिजीटल वारी या अभिनव उपक्रमाचे स्कॅन करून उदघाट्न करण्यात आले. विविध अडचणी सोशल मिडीयाव्दारे पोलिसांना कळवाव्यात, जेणेकरून पोलिसांना नागरिकांच्या अडचणींवर लवकर मात करणे शक्य होईल, असे आवाहन ठाणे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी केले आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या डिजिटल वारी या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ रविवारी ठाण्यात ठाणे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलिस सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, यांच्या हस्ते करण्यात आला. या डिजीटल वारीमध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या सोशल मिडीयावरील व्हॉट्सॲप, फेसबुक, इंन्स्टाग्राम, एक्स (ट्वीटर) आणि वेबसाईट या सोशल मिडीया चॅनलचे क्युआर कोड नागरिकांसाठी सुरू करण्यात आले. यावेळी बोलताना पोलिस आयुक्तांनी वरील आवाहन केले.
या कार्यक्रमास मराठी सिनेअभिनेता हार्दिक जोशी, मंगेश देसाई, गौरव मोरे आणि सिनेअभिनेत्री अक्षया देवधर हे देखील उपस्थित होते. पोलिसांच्या सोशल मीडीया प्लॅटफॉर्ममुळे नागरिकांना त्वरित माहिती मिळणे व त्यांच्याशी संपर्क साधणे शक्य होणार आहे. नागरिकांमध्ये जागरूकता वाढून गुन्हेगारांवर केलेल्या कारवाईची माहिती नागरिकांपर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे. पोलीस आणि जनतेत एकमेकाप्रती विश्वास वाढण्यास तसेच हरवलेल्या व्यक्ती व गहाळ झालेल्या वस्तु शोधणे सदर सोशल मिडीया प्लॅटफार्मव्दारे शक्य होणार आहे. तसेच पोलीसांच्या सामाजिक उपक्रमांबद्दल नागरिकांना माहिती देणे, पोलीसांशी थेट संवाद साधणे हेदखील सदर सोशल मिडीया प्लॅटफॉर्मव्दारे शक्या होणार आहे.
सिनेअभिनेता हार्दिक जोशी, मंगेश देसाई, गौरव मोरे आणि सिनेअभिनेत्री अक्षया देवधर यांनी ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या सोशल मिडीया चॅनलचे क्युआर कोड जास्तीत जास्त नागरीकांनी स्कॅन करून नागरिकांच्या काही तक्रारी अथवा अडचणी असल्यास ठाणे पोलिसांना तात्काळ कळवुन पोलीसांना सहकार्य करावे व पोलिसांशी कनेक्ट व्हावे असे ठाण्यातील जनतेला आवाहन केले.
*१८ उपविभागांचे हेल्पलाईन नंबर प्रसारित…
ठाणे पोलीस आयुक्तालयातील वाहतुकीसंदर्भात नागरिकांना काही अडचणी असल्यास किंवा मदत हवी असल्यास ठाणे वाहतुक शाखेने त्यांच्या १८ उपविभागांसाठह १८ हेल्पलाईन नंबर प्रसारित केले असून त्याचाही शुभारंभ या कार्यक्रमादरम्यान करण्यात आला.
चौकट
ठाणेनगर-८६५५६५४१७१, राबोडी-८६५५६५४१७२, नौपाडा-८६५५६५४१७३, कळवा-८६५५६५४१७४, मुंब्रा-८६५५६५४१७५, कोपरी-८६५५६५४१७६, वागळे-८६५५६५४१७७,
कापुरबावडी – ८६५५६५४१७८, कासारवडवली-८६५५६५४१७९, भिवंडी-८६५५६५४१८०, कोनगांव-८६५५६५४१८१, नारपोली-८६५५६५४१८२, कल्याण-८६५५६५४१८३, डोंबिवली-८६५५६५४१८४, कोळसेवाडी-८६५५६५४१८५, उल्हासनगर-८६५५६५४१८६, विठ्ठलवाडी-८६५५६५४१८७, अंबरनाथ-८६५५६५४१८८.या हेल्पलाईन क्रमांकाचा नागरिकांनी वापर करून त्यावर वाहतुकीसंदर्भातल्या त्यांच्या अडचणी पोलीसांना कळवाव्यात असेही आवाहन करण्यात आले.