महाराष्ट्र
आमची घटना अवैध तर मग आमदार पात्र कसे? - उद्धव ठाकरे
आमची घटना अवैध तर मग आमदार पात्र कसे? - उद्धव ठाकरे
फोटो: ठाणे वैभव
शिंदेंची शिवसेना ही त्यांची कधीच होऊ शकत नाही, त्यांचा आणि शिवसेनेचा संबंध कधीच संपला आहे, त्यामुळे शिवसेना ही आमचीच आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. स्वतः दोन-तीन पक्ष बदलणाऱ्या नार्वेकरांनी पक्ष कसा बदलावा हे सांगितलं, सर्वोच्च न्यायालयाचे नियमही धाब्यावर बसवले असं सांगत त्यांनी नार्वेकरांवरही आरोप केले. आमची घटना जर अवैध असेल तर मग आमचे आमदार अपात्र कसे काय असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचे नियम धाब्यावर बसवले. त्यांच्यामागे महाशक्ती असल्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयाच्या वर असल्याचे दाखवून दिले, असेही ठाकरे म्हणाले.
300x450
300x600