मितेश पटेल, विष्णू सोलंकी आणि अभिमन्यू सिंग यांच्या अर्धशतकांच्या जोरावर, बडोद्याने सोमवारी नागालँडसमोर ३०० धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले आणि १४० धावांच्या मोठ्या फरकाने सामना जिंकला. विजय हजारे ट्रॉफीमध्ये ई गटातील तिसऱ्या फेरीत नागालँडने दादोजी कोंडदेव स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रविवारी पडलेल्या पावसामुळे आउटफिल्ड ओली होती....