ठाण्यात मनसेकडून काळ्या फिती बांधुन निषेध
ठाणे: कपटनितीने आणि पैशांचा खेळ करून शिवसेना शिंदे गटाने सात उमेदवार बिनविरोध निवडून आणले. हे कृत्य लोकशाहीविरोधी असून मतदारांची घोर फसवणुक आहे, असा आरोप करीत मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मनसेने काळ्या फिती लावुन निषेध केला.
या बिनविरोध उमेदवारांनी प्रभागात कामच केलेले नाही, त्यामुळे ते ठाकरे ब्रॅण्डसमोर लढण्याची हिंमत करू शकत नाहीत. बिनविरोध निवड म्हणजे हा लोकांचा कौल नाही, तर पैशांचा खेळ आहे. पैशाने निवडणूक जिंकणारे एक दिवस जनतेलाही विकायला काढतील. अशी उद्वेगजनक प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी माध्यमांशी बोलताना दिली.