भारतीय राजकारण ‘विवेक’शुन्य का?

तो देशही परका आणि तुमची मुले भारतीय…. तरीही अमेरिके चे राष्ट्राध्यक्ष होण्याचे स्वप्न बाळगू शकत असाल तर तो त्यांच्या लोकशाहीचा विजय आहे असे मानायला हवे. विवेक रामास्वामी हे भारतीय आई-वडिलांच्या पोटी अमेरिके त जन्माला आल्यामुळे त्यांना आपण भारतीय मानावे काय, हा प्रश्न काही जणांच्या मनात डोकावू शकतो आणि तो रास्तही आहे. परंतु असा संकु चित विचार जागतिकीकरणाच्या दिवसात करणे संयुक्तिक ठरतो काय हा उपप्रश्न उत्पन्न होतोच. त्याबाबत मतमतांतरे होतील, पण त्याहीपेक्षा उद्योजक असलेल्या रामास्वामी यांना राजकारणात येऊन काहीतरी चांगले करावेसे वाटणे आणि अशा महत्त्वाकांक्षेला अमेरिकन लोकशाही व्यवस्था पूरक ठरत असेल तर ही बाब आपल्या देशातही अनुकरणीय ठरू शकते. भारतातही असे असंख्य लहान-मोठे उद्योजक आहेत ज्यांना शहराची, राज्याची आणि देशाची सेवा करण्याची मनिषा आहे. ते ज्याअर्थी यशस्वी उद्योजक आहेत त्याअर्थी लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडू शकतील. परंतु अशा प्रकारे श्रीमंत झालेल्या नागरिकांबद्दल राजकारण्यांच्या मनात एक अढी असते आणि ते या क्षेत्रात येणार नाहीत याची ते सर्वतोपरी काळजी घेत असतात. भारतीय राजकारणातील आणि विशेषतः निवडणूक लढवणे आणि जिंकणे याबाबतचे नियम आपल्या पुढार्यांनी सफाईदारपणे बदलले. त्याचा परिपाक असा की सकारात्मक, निःस्वार्थ आणि प्रामाणिकपणे लोकहिताचे काम करण्याची आस असणाऱ्या असंख्य नागरिकांना आपल्या व्यवस्थेने प्रोत्साहन दिले नाही. अमेरिके त हे घडत आहे. इंग्लंडमध्ये ऋषी सुनक यांना पंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी मिळाली. भारतात गेल्या किती वर्षात एका चांगल्या उद्योजकाला आपण संधी दिली आहे? कर्तबगार डॉक्टर, वकील, अभियंते, बँकर, अर्थवा पर्यावरण तज्ज्ञ आदींना संधी मिळाली तर ते अधिक चांगल्या प्रकारे सेवा करू शकतील. दर्ुदैवाने स्वीकृ त सदस्य म्हणून या मंडळींचा खचितच विचार होत नाही. उद्योगधंदा करणे, पैसा कमवणे आदी गुणवैशिष्ट्ये राजकारणात लागू होत नाही हे पूर्वी कोणीतरी ठरवून टाकले आणि तीच रेघ पुढचे लोक ओढत गेले. त्यामुळे राजकारणाचा पोत बिघडत गेला. लोकशाही अधिक सक्षम आणि परिपक्व होण्यासाठी सुदृढ आणि विधायक मानसिकतेच्या नागरिकांना संधी मिळायला हवी. त्यासाठी ‘इलेक्टिव्ह मेरिट’चे निकष बदलायला हवेत. रिपब्लिकन पक्षातर्फे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा तगडा उमेदवार रिंगणात उतरल्यावर रामास्वामी यांचा किती टिकाव लागेल हे सांगता येणार नाही. परंतु म्हणून त्यांनी अध्यक्षपदाचे स्वप्नच पाहू नये काय? रामास्वामी, सुनक भारतीय आहेत, पण ते या देशात राहिले असते तर त्यांना हे स्वप्नही पाहता आले नसते. आपण राजकारणात सुधारणा व्हावी असे म्हणतो खरे, परंतु चांगल्या उमेदवारांची खिल्लीही उडवतो. हा विरोधाभास
थांबायला हवा.