लोकसभेच्या ३२ जागा लढवण्यावर भाजपा ठाम

* ठाणे संजीव नाईक यांना मिळण्याची शक्यता
* भिवंडीसाठी कपिल पाटील यांना पसंती

मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईत असून महायुतीमधील जागावाटपाचा तिढा लवकरच सुटणार असल्याचं चित्र आहे. त्याचवेळी एक मोठी बातमी समोर येत असून भाजप 48 पैकी 32 जागा लढवण्यावर ठाम असल्याचे समोर आले आहे.

भाजपा या 32 जागांवर ठाम असून काही जागांवर शिंदे गट आणि अजित पवार गट आग्रही असल्याचे पाहायला मिळत आहे.

पुणे-मुरलीधर मोहोळ, धुळे-सुभाष भांबरे यांच्याऐवजी प्रदिप दिघावरकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता, हिंगोली-हेमंत पाटील यांच्या जागेसाठी भाजपा आग्रही असून त्याठिकाणी भाजपा तानाजी मुरकुटे यांना मिळण्याची शक्यता, जालना- रावसाहेब दानवे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता, चंद्रपूर-सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेला पाठवल जाण्याची शक्यता, नागपूर-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कायम ठेवले जाणार, नंदूरबार-हिना गावित किंवा विजयकुमार गावीत, अकोला- संजय धोत्रे, ईशान्य मुंबई-मनोज कोटक, सोलापूर-सिद्धेवर महाराज यांच्याऐवजी अमर साबळे यांना मिळण्याची शक्यता, कोल्हापूर-सध्या ही जागा शिंदे गटाकडे आहे मात्र भाजपा आग्रही आहे, भंडारा-गोंदिया- सुनिल मेंढे, बीड-विद्यामन प्रितम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे, माढा-रणजितसिंह निंबाळकर, गडचिरोली-अशोक नेते यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम भाजपा चिन्हावर लढू शकतात, भिवंडी-कपिल पाटील, सांगली- संजयकाका पाटील यांच्याऐवजी कॉग्रेसचे विशाल पाटील भाजपा पक्ष प्रवेश करून लढू शकतात, सातारा-उदयनराजे भोसले, जळगाव-उन्मेष पाटील किंवा ए टे नाना पाटील, दिंडोरी-भारती पवार, रावेर-अमोल जावळे, उस्मानाबाद- बसवराज पाटील (नुकताच बसवराज पाटील यांनी भाजपा पक्षप्रवेश केला आहे., उत्तर मुंबई-गोपाळ शेट्टी यांच्या ऐवजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना मिळण्याची शक्यता, संभाजीनगर- विद्यमान मंत्री अतुल सावे किंवा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, उत्तर मध्य मुंबई-पुनम महाजन यांच्या ऐवजी आशिष शेलार यांना मिळण्याची शक्यता, ठाणे : डॉ.संजीव नाईक यांना मिळण्याची शक्यता. ही जागा सध्या शिंदे गटाकडे आहे मात्र भाजपा घेण्यास आग्रही आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग-नारायण राणे. (रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये अजूनही वाद सुरू आहे शिंदे गटाकडून किरण सामंत लढण्यास इच्छुक आहेत), दक्षिण मुंबई-राहूल नार्वेकर, नांदेड-मिनल खतगावकर (अशोक चव्हाण यांची भाची. आज सकाळी अमित शहा यांची भेट घेतलेली), राजेंद्र गावीत सध्या राजेंद्र गावित शिंदे गटात आहेत मात्र ते भाजपा पक्ष प्रवेश करून भाजपा तिकिटावर लढतील अशी शक्यता आहे, अहमदनगर-सुजय विखे पाटील किंवा राम शिंदे.सध्या नगरमध्ये वाद सुरू आहे., अमरावती- नवनीत राणा यांचा भाजपा पक्ष प्रवेश होईल. मात्र नवनीत राणा यांचा जातीच्या प्रमाणपत्रावरून वाद सुरू आहेत. या जागेवर आनंदराव अडसूळ हे देखील आग्रही आहेत.