महावितरणचा हलगर्जीपणा
उल्हासनगर: उल्हासनगरच्या पंजाबी कॉलनी परिसरात राहणारा १७ वर्षीय आयुष रॉय ह्या तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे, या घटनेनंतर कुटुंबीयांनी महावितरणच्या विरोधात आरोप केले आहे,
एटीपी हायस्कूलजवळ रॉय कुटुंब वास्तव्यास आहे, दोन दिवसांपूर्वी रॉय यांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. याविषयी त्यांनी संबंधित महावितरण कार्यलयात तक्रार दाखल केली होती, परंतु दुरुस्ती न झाल्याने आज आयुष रॉय हा तरुण पत्र्यावर चढून वायरचे निरीक्षण करीत होता. यावेळी तारेच्या संपर्कात येऊन त्याला जोरदार धक्का बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
याविषयी रॉय कुटुंबियांनी महावितरणच्या निष्काळजीपणाबद्दल संताप व्यक्त केला आहे.