इंग्लंड महिलांनी भारतावर चार गडी राखून टी-20 मालिका जिंकली

Photo credits: PTI

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर शनिवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात कमी धावसंख्येच्या चकमकीत इंग्लंडच्या महिलांनी भारतीय महिला संघावर चार विकेट्सने मात केली. या विजयासह, इंग्लंडने या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. भारताने केवळ 2006 मध्ये इंग्लड विरुद्ध टी-20 द्विपक्षीय मालिका जिंकली आणि तेव्हापासून त्यांनी कधीही इंग्लंडचा टी-20 मालिकेत पराभव केला नाही.

नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत इंग्लंडने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. 16.2 षटकात 80 धावा करता आल्याने भारतीय फलंदाजी पत्त्याच्या गठ्ठासारखी कोसळली. 80 हा भारतीय महिलांचा इंग्लंड महिलांविरुद्धचा सर्वात कमी टी-20 आणि एकूणच तिसरा सर्वात कमी धावसंख्या आहे. जेमिमा रॉड्रिग्स ही लढाईतील एकमेव योद्धा होती कारण तिने 33 चेंडूत 30 धावा केल्या. रॉड्रिग्सशिवाय, स्मृती मानधना (१०) ही सलामीवीर दुहेरी अंकात धावा करणारी दुसरी फलंदाज होती. चार्ली डीनसह गोलंदाजीची सलामी देण्याची इंग्लंडची योजना उत्तम ठरली कारण त्या ऑफस्पिनरने भारताच्या शफाली वर्मा (0) आणि मानधना या सलामीच्या जोडीला स्वस्तात बाद केले. यजमानांनी अन्यथा फलंदाजीसाठी अनुकूल विकेटवर फलंदाजीसह निराशाजनक प्रदर्शन केले. लॉरेन बेल, सोफी एकलस्टन आणि सारा ग्लेन हे इतर इंग्लिश गोलंदाज होते ज्यांनी प्रत्येकी दोन विकेट्स पटकावल्या.

प्रत्युत्तरात, रेणुका सिंग ठाकूरच्या शानदार नवीन बॉलिंगच्या सौजन्याने, इंग्लंडने पहिल्या तीन षटकांत त्यांचे सलामीवीर डॅनियल वायट (0) आणि सोफिया डंकले (9) गमावले. तथापि, पहिल्या टी-20 मधील सामनावीर ठरलेल्या नॅट सिव्हर-ब्रंट (16) हिने अॅलिस कॅप्सी (25) सोबत मिळून चांगली भागीदारी केली आणि संघाला संकटाच्या परिस्थितीतून बाहेर काढले. डावाच्या 11व्या षटकात जेव्हा दीप्ती शर्माने दोन चेंडूत दोन गडी बाद केले तेव्हा या सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने जमलेल्या चाहत्यांना आशेची किरण दिली. तथापि, एकलस्टनने श्रेयंका पाटीलच्या गोलंदाजीवर चौकार मारून सामना शैलीत पूर्ण केल्याने अपरिहार्यतेला जास्त उशीर झाला नाही. पाहुण्यांनी लक्ष्य 11.2 षटकांत पार केले आणि 52 चेंडू शिल्लक असताना चार विकेट्स राखून सामना जिंकला.

भारत हा सामना हरला असला तरी वानखेडे स्टेडियमवरील वातावरण रमणीय होते कारण जवळ जवळ २०,००० लोकं तेथे जमली होती. पहिल्या डावाच्या मध्यभागी ग्राउंड स्टाफला उत्साही क्रिकेटप्रेमींना आत जाण्यासाठी स्टेडियमचे अतिरिक्त दरवाजे उघडावे लागले. विमेन इन ब्लू जिंकताना चाहत्यांना नक्कीच आवडले असते, तथापि ते रॉड्रिग्जची धाडशी खेळी, कॅप्सीला बाद करण्यासाठी अमनजोत कौरचा अविश्वसनीय झेल, दीप्तीचा डबल स्ट्राईक आणि रेणुकाची नवीन चेंडूने गोलंदाजी अशा  काही गोड आठवणी घेऊन गेले असतील.

चार्ली डीनने तिच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या कामगिरीसाठी, विशेषत: नवीन चेंडूसह सामनावीराचा पुरस्कार जिंकला. पहिली टी-२० चुकल्यास तिने दुसऱ्या सामनात चार षटकात फक्त १६ धावा देऊन दोन गडी बाद केले.

ही मालिका भारताच्या बाजूने गेली नसावी पण मालिकेतील तिसर्‍या आणि शेवटच्या टी-20 सामन्यासाठी ते इंग्लंडविरुद्ध खेळत असताना रविवारी त्यांचे चाहते आणखी मोठ्या संख्येने स्टेडियमवर परततील अशी आशा संघाला आहे.