उल्हासनगर :- उल्हासनगर शाळा क्रमांक 18 व 24 या शाळांची पुनर्बांधणी करा अशी सातत्याने मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे, मात्र तांत्रिक अडचणीची सबब पुढे करून मनपा प्रशासनाने जवळपास 3 ते 4 वर्षे करून रखडविले असल्याचा आरोप मनसेने केला आहे .
या संदर्भात मनसेने मनपाचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांना लेखी निवेदन दिले असून जर लवकरात लवकर शाळा पुनर्बांधणीचे काम सुरू झाले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे .
मनसेच्या पाठपुराव्यानंतर शाळा क्रमांक 18 व 24 च्या पुनर्बांधणीसाठी या शाळांची इमारत तोडून जवळपास 3 ते 4 वर्षाचा कालावधी उलटला असून शाळेच्या बांधकामातील तांत्रिक अडचणी दूर करून हया शाळेच्या बांधकामला तात्काळ सुरवात करण्यात यावी यासाठी आम्ही प्रशासनाला प्रत्यक्ष भेटून,निवेदनाद्वारे वारंवार विनंती सुद्धा केली आहे.खरं तर आत्ता पर्यंत हया शाळेची नवीन इमारत तयार होने अपॆक्षित होते परंतु प्रशासन या गोर-गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणा बाबत गंभीर दिसत नाही असा आरोप मनसेच्या तन्मेश देशमुख यांनी केला.
शाळा पुंर्नबांधणी साठी तोडल्या नंतर प्रशासनाने या शाळेतील विध्यार्थ्यांची व्यवस्था ही इतर ठिकाणी केली परंतु ज्या ठिकाणी या विध्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे ती जागा शाळेपासून बरीच लांब आहे.त्यामुळे या विदयार्थ्यांना रोज मोठी पायपीठ करावी लागते.कारण या शाळेत शिकणारे विद्यार्थी हे अंत्यन्त गरीब कुटूंबातील आहेत.त्यामुळे त्यांना रिक्षा किंवा इतर वाहनाने प्रवास करणे परवडत नाही.
ज्या ठिकाणी ही शाळा भरते त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत व यामुळे या गोर-गरीब विदयार्थ्यांच मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.
या विदयार्थ्यांना त्यांच्या हक्काची शाळा लवकरात लवकर उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. गोर-गरीब विदयार्थ्यांना एक सुसज्य शाळा लवकरात लवकर उपलब्ध करून दयावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करेल असा लेखी निवेदनाद्वारे इशाराही विद्यार्थी सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.यावेळी जिल्हा सचिव संजय घुगे, शहर अध्यक्ष बंडू देशमुख,मनविसेचे उपजिल्हा अध्यक्ष ऍड कल्पेश माने विभाग अध्यक्ष सागर चौहान यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.